शिवसेना चिन्ह वाद पुन्हा लांबणीवर; ठाकरे गट नाराज

मुंबई | विशेष प्रतिनिधी

शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ चिन्ह आणि पक्षनावावरून सुरू असलेला सुप्रीम कोर्टातील वाद आज पुन्हा ऐरणीवर आला; मात्र न्यायालयाने निकाल देण्याऐवजी पुन्हा एकदा सुनावणी २१ जानेवारी २०२६ पर्यंत पुढे ढकलल्याने उद्धव ठाकरे गट नाराज झाला. ठाकरे समर्थकांच्या मते, “न्यायालयाकडून सतत विलंब केला जात आहे आणि त्यामुळे आमच्यावर  अन्याय होत आहे.”

आज सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरे यांच्या वकिलांनी सुनावणी लवकर घेण्याची विनंती केली.मात्र न्यायालयाने प्रकरणाचा निर्णय न देता पुढील तारीख २१ जानेवारी २०२६ निश्‍चित केली.ठाकरे गटाने हे “अन्यायकारक व राजकीय दबावाखालील विलंब” असल्याचे मत व्यक्त केले.

ठाकरे समर्थकांनी प्रश्न उपस्थित केला की, “शिंदे गटाला तातडीने निर्णय मिळतो, पण उद्धव ठाकरे गटाच्या याचिका वारंवार पुढे का ढकलल्या जातात?”

उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले —

“आम्ही न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवतो, पण न्यायालयाचा विलंब हा अन्याय ठरत आहे. निवडणुका जवळ आल्या आहेत आणि चिन्हावरील अनिश्चितता पक्षासाठी नुकसानकारक ठरत आहे.”पक्षातील काही नेत्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटलं की, “शिंदे गटाला राजकीय संरक्षण मिळतंय आणि आमच्यावर प्रक्रिया लांबवून दबाव आणला जातोय.

२०२२ मध्ये शिवसेनेत झालेल्या फुटीनंतर उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे गटांमध्ये ‘खरी शिवसेना’ कोणाची, यावर वाद सुरू झाला.निवडणूक आयोगाने फेब्रुवारी २०२३ मध्ये ‘धनुष्यबाण’ चिन्ह शिंदे गटाला दिलं.उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.

आता या प्रकरणाची सुनावणी २१ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजता होईल.त्यावेळी दोन्ही गटांचे अंतिम युक्तिवाद ऐकले जातील.

अनेक शिवसैनिकांनी सोशल मीडियावर हॅशटॅग #JusticeForUddhav ट्रेंड करत संताप व्यक्त केला.

“राजकारणात ताकदवानांचा आवाज ऐकला जातो, पण न्यायासाठी लढणाऱ्यांना थांबवलं जातं,” असे मत अनेक कार्यकर्त्यांनी मांडले.

नविन बातम्यांसाठी 👉 http://ahilyanagar24live.com

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!